Tuesday, 19 May 2015

माणसाची मोजणी




माणसाची मोजणी
           लहानपणापासून एक विधान नेहमी ऐकत असतो " वेश असावा बावळा परी अंगी नाना कळा " आता हे विधान नेमके कुणाचे हे आठवत नाही पण मला असं सांगणारे हे नेहमी कडक वेषात आणि सतत लवाजमा सोबत असणारे आणि बक्कळ पैसा घेवून मिरवणारे असत, हे सगळ असतना कुठे आला वेष बावळा आणि कुठे आल्या नाना कळा . हे मात्र नक्की आहे कि ह्यंचा पैसा पाहून ज्या लोकांकडे तो नाही त्यना तो पाहून नक्कीच पोटात कळा येत असाव्यात. त्यावेळी कुठेतरी जाणवल की लोक माणसाची मोजणी पैसा ह्या प्रकारात करतात. एक म्हण आहे ' बळी तो कान पिळी ' म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे तो काहीही करू शकतो असा गैरसमज लोकच समाजात पसरवत असतात .
          तो अमका अमका आहे न त्यच्याकडे रग्गड पैसा आहे. खूप दिलदार माणूस आहे . आपला खास मित्र आहे . ह्या प्रकारची विधाने आपसूकच तोंडातून बाहेर पडतात. एकीकडे उगीच गावगप्पा माऱ्याच्या की बंधुता, समता , एकोपा हेच खूप महत्तवाचे अंग आहेत जे मानवला सुखी ठेवतात आणि जिकडे पैसा दिसेल तिकडे उड्या मारत सुटायच्या अशी मानसिकता बनत चालली आहे आज काल . हे माणसा- माणसात आहे ते ठीक आहे पण पैसा ह्या गोष्टीने देव पण नाही सोडला . अमक्या अमक्या दिवशी आम्ही " बालाजी" ला गेलो होतो , हजारो रुपये खर्च आला , आम्ही पैसे मोजले आणि दर्शन घेतले लवकर आणि चांगले दर्शन झाले. अहो नुसते पैसा मोजा सगळ्या सुख-सोई तुम्हाला भेटत असतात. जाताना येताना विमानाने प्रवास केला. काही जण म्हणतात "शिर्डी " ला गेलो होतो " पंढरपूर" ला गेलो होतो , हज ला गेलो होतो , अमुक तमुक trvael agency  बरोबर अष्टविनायक , चार धाम केले सगळे केले पण भरपूर पैसे खर्च केले. हेच लोक कधी असे बोलत नाही की  आम्ही शेतातल्या म्हसोबाला जायला वेळ नसतो (काही रोज जात असतील ही ) गावदेवी ला जायला वेळ नसतो. कारण तिथे पैसा लागत नाही आणि ते देव फेमस नाहीत.
        लोक बोलतात भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे, इथे हेच लोक देवाचं दर्शन व्हावं म्हणून पैसा देतात , तर अश्या लोकांकडून काय अपेक्षा करणार भ्रष्टाचार संपवण्याची ? देव हे खूप मोठे श्रद्धा स्थान आहे तिथे लोक लाच देतात मग ते सरकारी कामात लाच देणारच फरक इतकाच आहे की "देवळात देव लाच मागत नाही लोक देतात " सरकारात किंवा सामान्यतः  सगळीकडे लाच मागितली जाते आणि नाही मागितली तरी काम पूर्ण व्हावे म्हणून देणारे महाभाग खूप असतात ह्य्लाच म्हणतात पैश्याची मस्ती .
      पैसा हा ज्यचा- त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे , कुणी कसा कमवावा कसा खर्च करवा हे ज्याने - त्याने ठरवावे , कमवलेल्या पैश्याचा उपभोग पण घ्यावा, पण पैसा आला म्हणून खूप हुरळून जावू नये, किंवा अंगात मस्ती येवू नये , तुम्ही पैशाय्ने माणूस विकत घेवू शकता माणुसकी नाही , तुम्ही पैशाय्ने घर विकत घेवू शकता शांती नाही, तुम्ही पैश्याने पलंग घेवू शकता शांत झोप नाही , तुम्ही पैश्याने सगळ काही घेवू शकता पण " आनंद आणि समाधान " कधीच विकत घेवू  शकत नाही .
         ९९% मानवी गरजा हा पैसाच पूर्ण करू शकतो , पण मानवी गरजा किती आणि का ? हे फक्त  माणूस ठरवू शकतो. माणसाकडे पैसा नसला कि तो हिरमुसतो, नशिबाला , देवाला दोष देत बसतो . मात्र  अश्यावेळी तो मनाचे समाधान आणि मनशांती हरवून बसतो . आणि ज्याच्याकडे पैसा आहे तो पैसा वाटत फिरतो आणि सुख शोधत आसतो.
          आपण पहिले माणसाचे मोजमाप पैसा ह्या फुटपट्टी ने करण बंध केले , पाहिजे गरजा प्रमाणात ठेवल्या पाहिजेत , म्हणजे वाईट वाटणार नाही , जरी खूप पैसा आला तर तो साठवला पाहिजे आणि इतरना मदत करून त्यांना पण धनवान बनवले पाहिजे (आर्थत जास्त नुकसान न होता ) शेवटी काय " जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे " आणि मनशांती - समाधान हेच खरे दागिने आहेत .
         पहा विचार करा, जमल तर आचरणात आणा ………।


सागर शिंदे @  

No comments:

Post a Comment